सत्तरीतील शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत...
वाळपई, ता. ५ -सत्तरीत पुरणशेती करणारे शेतकरी गेली पाच वर्षे नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना अद्याप कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. गेली अनेक वर्षे शेतकरी दोन महिने काम करून पुरणशेतीमार्फत दुप्पट पीक काढत होते. पण, आता सरकारने नद्यांवर बंधारे बांधल्यामुळे त्यांच्यासमोर समस्या निर्माण झाली आहे.
सत्तरीत म्हादई व रगाडा या दोन नद्यांवर ९५७ शेतकरी पुरणशेती करत असत. मात्र त्यांची ही शेती आता बंद पडली आहे. यामुळे कृषी खात्याच्या अंदाजपत्रकानुसार दरवर्षी सुमारे २८ लाख १८ हजार १५० रुपयांचे नुकसान होत आहे. याबाबत आतापर्यंत बराच पत्रव्यवहार झाला असला तरी शेतकऱ्यांना अजूनही नुकसानभरपाई मिळालेली नाही.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment