Monday, August 4, 2008

साळावळी धरणाच्या निर्वासितांना न्याय मिळायला एवढा विलंब का? याबाबतची आपली मते नोंदवा.

कुर्डीतील ८९ कुटुंबे अजूनही निर्वासितच
सांगे, ता. ४ दक्षिण गोवा "सुजलाम्‌' व्हावा या शुद्ध हेतूने गोव्याचे शिल्पकार भाऊसाहेब बांदोडकर यांनी साळावली धरणाची निर्मिती केली. या घटनेला आज ३५ वर्षे होत आली. मात्र ज्याची ओळख "त्यागभूमी' अशी झाली त्या कुर्डी गावातील ८९ कुटुंबे आजही वाडे - कुर्डी येथील "स्थलांतर भूमीत' निर्वासिताचे जिणे जगत आहेत. त्यांचा गाव हलवण्यापूर्वी त्यांना दिलेली आश्‍वासने पाळण्यात आली नाहीत. त्यामुळे ना घरासाठी जागा ना, शेतीसाठी जमीन अशी त्यांची अवस्था आहे!
१९७२ साली साळावली धरणासाठी कुर्डी येथे सर्वेक्षणाचे काम सुरू झाले. तत्पूर्वी भाऊसाहेब कुर्डी गावात येऊन ग्रामस्थांच्या सभा घेऊन कुर्डीवासीयांना गोव्यासाठी धरणाची आवश्‍यकता कशी आहे हे पटवून सांगत होते. त्यावेळी कुर्डीतल्या प्रत्येक कुटुंबीयांना ४०० चौ.मी. घरासाठी भूखंड व शेतीसाठी २०,००० चौ. मी. जागा देण्याचे मान्य केले होते. पण, त्यांच्या आश्‍वासनाला त्यानंतर आलेल्या राणे सरकारने हरताळ फासत २०,००० च्या जागी शेतीसाठी १०,००० चौ. मी. जागा देऊन शेतकऱ्यांची बोळवण केली.

No comments: